राज्यात जूनमध्ये कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.. त्यावर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आलीये.. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.. दरम्यान जर पाऊस लांबणीवर गेला तर राज्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे...
