Modi Government 9 Years: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला (BJP Government) नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं (Modi Government) यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान देशातील प्रत्येक राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. जेथे भाजपचे सरकार असेल तिथे केंद्रीय मंत्री त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतील आणि जिथे भाजपचं सरकार नसेल तिथे केंद्रीय मंत्री पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह माध्यमांना संबोधित करतील. यावेळी मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील सर्व कामगिरीवर आधारित सादरीकरणही करण्यात येणार आहे. तसेच, मोदी सरकारनं केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला जाईल.
'या' शहरांमध्ये प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) मुंबईत, अनुराग ठाकूर (Anurag Thakur) अहमदाबादमध्ये, मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) बेंगळुरूमध्ये, हरदीप पुरी (Hardeep Singh Puri) लखनौमध्ये, अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) गुवाहाटीमध्ये, भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) भोपाळमध्ये, अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) हैदराबादमध्ये, जितेंद्र सिंह (Jitendra Singh) चेन्नईमध्ये, गजेंद्र सिंह (Gajendra Singh Shekhawat) पटना, मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) कोलकात्यात स्मृती इराणी (Smriti Irani) रोहतकमध्ये आणि पीयूष गोयल (Piyush Goyal) जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
Wrestlers Protest News: दिल्लीच्या (Delhi) जंतरमंतरवर (Jantar Mantar) महिला कुस्तीपटुंच्या आंदोलनात (Wrestlers Protest News) सहभागी असलेल्या बजरंग पुनियाला (Bajrang Punia) पोलिसांनी मध्यरात्री सोडलं. बाहेर आल्यानंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर (Delhi Police) निशाणा साधला आहे. बजरंग पुनिया म्हणाला की, हे या देशाचं दुर्दैव आहे, ज्याच्यावर वारंवार लैंगिक छळाचे आरोप होत आहेत, असा आरोपी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित होता.
बजरंग पुनिया म्हणाला की, दिल्ली पोलिसांनी आमच्याविरुद्ध केवळ 7 तासांत एफआयआर (FIR) नोंदवला, पण बृजभूषण (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी त्यांना 7 दिवस लागले. तसेच, बजरंग पुनियानं कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत पुढची रणनिती काय असेल? याबाहतही माहिती दिली. बजरंग पुनिया म्हणाला की, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत घरी जाण्यात काहीच अर्थ नाही.